![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiW7i9BODJjJDIM5WoxCH6LyIx_FVnvdKNX-5W8FCpP6_fJMNaEaLof24NoK95j0UYSXaXRqA3zcJSo1EfI4sTjjjZY9A0E27fCmDz7e6-MsvuLwDs9QphSdaKUag3dmU9mAp7SQVjdnI8/s400/DSCN1948+Wtrmrkd.jpg)
विस्थापन झालेल्या गावातले चित्र आहे. लोक घरे सोडून, छतं मोडून गेले आहेत. संपूर्ण गावभर हे असेच अवशेष आहेत शिल्लक. त्या गावातून जात असताना सगळ्या गावाचं भूत झालंय असं वाटत होतं.
कुणाच्या अंगणात पेरूला बारके पेरू लागले होते. कुणी अंगणाच्या पेळूवर स्लिपर्स विसरले होते. कुठे शेवटची चूल पेटवून पुजा केल्याच्या खुणा होत्या. कुणी छताच्या नळ्यांसकट घर तसेच टाकून गेले होते. विस्थापन होऊन जेमतेम दोनेक महिनेच झाले असावेत असं सांगणार्या अनेक खुणा होत्या. भयंकर भयंकर वाटत होतं..
-नी