Wednesday, February 28, 2018

कापडाचोपडाच्या गोष्टी


बरेच दिवसांपासून वेशभूषेचा इतिहास या विषयाला धरून काहीतरी लिहायचं मनात होतं. वेशभूषेचा इतिहास शिकताना समाज, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान अश्या सर्व गोष्टींच्या इतिहासाला समजून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. थोडक्यात आपले कपडे हे आपल्या जगाची कहाणी सांगतात असं म्हणता येईल. हे मला फार गमतीशीर आणि महत्वाचं वाटतं. तर तेच सगळं तुमच्या पर्यंत पोचावं म्हणून जानेवारी २०१८ पासून लोकमतच्या सखी पुरवणीमध्ये हा विषय घेऊन सदर सुरू केले आहे. दर महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी हे सदर येईल. सदराचे नाव आहे ‘कापडाचोपडाच्या गोष्टी’. थोडी गम्मत, थोडी माहिती असे काहीसे स्वरूप आहे या सदराचे.
संपूर्ण लेख ब्लॉगवर टाकणार नाहीये. पण इथे लोकमतच्या लेखांच्या लिंका देते आहे.
  • माणसाच्या मूलभूत गरजा तीन - अन्न, वस्त्र आणि निवारा हे आपण शाळेत असताना पाठ केलेले आहे. या तिन्ही गरजांचा इतिहास म्हणजे अख्ख्या मानवजातीचा इतिहास आहे. राजकीय, सामाजिक, वैज्ञानिक सर्व प्रकारच्या स्थित्यंतरांचे प्रतिबिंब या इतिहासात पडलेले दिसते. विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर माणसांचे स्थलांतर होते. अशा स्थलांतरानंतर जी देवाणघेवाण होते त्यातून कपड्यांचा इतिहास नवे वळण घेत जातो.    हे सर्व कुठून येते? २९ जानेवारी २०१८
  • आजच्या जगाचा विचार केला तर अंगाभोवती वेगवेगळ्या प्रकारे कापडाचे वेढे घालून बनवायची वस्त्रं ही केवळ भारतीय उपखंडात किंवा भारतीय उपखंडात मूळ असलेल्या लोकांच्यातच दिसतात. त्यामुळे भारतीयांनाच केवळ ही भन्नाट आयडिया सुचलेली आहे असा गैरसमज व्हायला भरपूर वाव असतो.  
    नेसूचे आख्यान 
    - २७ फेब्रुवारी 
  • अंगाभोवती कपडे गुंडाळून वस्त्रे तयार करण्याची आयडिया फक्त भारतीय उपखंडातली नसली तरी अंतरीयाचे किंवा कमरेवर बांधलेल्या वस्त्राचे काष्टा घालून दुटांगीकरण हे मात्र केवळ भारतीय उपखंडातच दिसून येते. 
    'साडी नेसणं...' 
    - २७ मार्च 
  • उगाचच शरीर झाकून ठेवण्याला नकार देणारी, शरीराचे आकार-उकार स्पष्ट करणारी वस्रं ही आपल्या भारतातच अस्तित्वात होती. ऐकायला, वाचायला गैरसोयीचं वाटलं तरीही हे आपल्याच महान संस्कृतीत घडलं..
    'झाकपाक' 
    २४ एप्रिल
  • माणसं प्रवास करतात, स्थलांतर करतात, नवीन प्रदेश पादाक्रांत करतात. आपल्या जगण्याच्या पद्धती या नवीन ठिकाणी घेऊन जातात आणि नवीन ठिकाणच्या पद्धती आत्मसात करतात. नवीन प्रदेश पाहून, तिथल्या नवीन आणि मजेमजेच्या गोष्टी प्रवासी लोक आपल्या बरोबर घेऊन येतात. नवीन आलेल्या पद्धती आणि स्थानिक पद्धतींचा मिलाप होतो आणि संस्कृतीची कथा नवं वळण घेते..आपलं काय काय म्हणायचं? - २९ मे 
  • ब्रिटिश भारतात आले तोपर्यंत भारताच्या वस्त्नकलेनं खूप प्रगती केलेली होती. भारतभरात प्रदेशानुसार कापड विणण्याचे प्रकार, त्यावरची नक्षी, कलाकुसर, कापड रंगवण्याची भारतीय साधनं आणि प्रक्रि या या सर्व गोष्टींचं प्रचंड वैविध्य होतं. काश्मिरी शालींबरोबरच याही सगळ्याची युरोपातून आलेल्या व्यापार्‍यांना भुरळ पडली.
    भारतीय वारसा - २६ जून
  • एखाद्या संस्कृतीशी जोडलेली प्रतीकं, चिन्हं यांची देवाणघेवाण होणं हे अपरिहार्य आहेच,काही प्रमाणात!ते स्वागतार्हही आहे. नक्की किती आणि काय योग्य आणि अयोग्य याविषयी मात्र अजून संभ्रम आहेत.
    थांब सेलिना बिंदी लावते! - ३१ जुलै
  • रोमानिया देशाचं फॅशनला वाहिलेलं एक मासिक.बिहोरच्या लोकांबरोबर त्यांच्या पारंपरिक भरतकाम कलेसाठी उभं राहिलं. आयुष्यभर भरतकाम करणा-या हातांनी आपल्या सुया, कात्र्यांनीशी लढायचं ठरवलं. बिहोरचे लोक अणि हे मासिक यांनी एकत्र येऊन बिहोर फॅशनचा एक ब्रॅण्ड तयार केला. आपल्या हातांनी बनवलेल्या सगळ्या पारंपरिक वस्तू योग्य नफा आकारून, पण तरीही सामान्य माणसाला परवडेल अशा किमतीत ऑनलाइन विकायला सुरूवात केली. थोड्याच दिवसात दणदणीत विक्रीचा एक उच्चांक गाठला गेला. 
    बलाढ्य दुष्टाचा पराजय आणि इतर गोष्टी - २८ ऑगस्ट
  • युरोपातले उच्च खानदानी लोक आणि सत्ताकेंद्र यावर फॅशनच्याद्वारे नियंत्नण ठेवण्याची चौदाव्या लुईची योजना होती. उच्च अभिरूची, चोखंदळ,शानदार राहणीमान, विलासी जीवन या गोष्टींचं केंद्र फ्रान्स असलं पाहिजे अशी त्याची इच्छा होती. उंची आणि महागडी कापडं,कपडे, आभूषणं आणि इतर वस्तू फ्रान्समध्ये बनवल्या जाव्यात हे त्यानं घडवून आणलं.
    कूत्यूरोद्योग - २५ सप्टेंबर 

  • ती कार्यकर्ती आहे? वाटत नाही अजिबात. साडी पाहिलीस का तिची? कॉटनबिटन नाहीये. व्यवस्थित फुलांचं डिझाइन आहे आणि नायलॉनची दिसते आहे. कार्यकर्तीचा साधेपणा कुठेय यात?’ ठकूच्या कार्यकर्त्या मैत्रिणीबद्दल कुणी तरी कुजबुजलं. कुजबूजकाकू पण कार्यकर्त्या होत्या. त्यांचा कार्यकर्ती म्हणून गणवेश एकदम मान्यताप्राप्त होता.  साधेपणाच्या नोंदी ३० क्टोबर 
  • माणसानं कापड, रंग यांच्या साहाय्यानं शरीर झाकायला आणि सजवायला सुरू केलं तेव्हापासून कातडीवरचं आवरण हे त्या माणसाबद्दल बरंच काही सांगणारी दृश्यभाषा आहे. आणि ती वाचायला शिकणं ही मजेची गोष्ट आहे.
    शब्देविण संवादु! - २७ नोव्हेंबर
  • जानेवारीपासून 'कापडाचोपडाच्या गोष्टी' हे सदर लिहिले. आजच्या 'अजून थोडी इतिहासाची पानं!' या लेखाने सदराचा समारोप करते आहे.  अजून थोडी इतिहासाची पानं - २५ डिसेंबर 


वाचा आणि प्रतिक्रिया कळवत राहा.

- नी 

गौरी आणि मी!



व्हॅलेन्टाइन निमित्त लिहिलेले काही 
वाचण्यात आलेल्या प्रेमाच्या गोष्टींमधे जिच्या गोष्टी जास्त खर्‍याजास्त हाडामासाच्या आणि हे असे प्रेम जास्त शक्य आहे अश्या वाटल्या   तिच्याबद्दल थोडेसे... 
माझ्या टीनएज काळात आजूबाजूला अनेक ठरीव आणि कंटाळवाण्या गोष्टी होत्यामुली स्वप्नांचे पतंग उडवू लागल्या तर ‘सासरी चालणार का पण?’ असला भिकारडा प्रश्न विचारून त्या स्वप्नांची वाट लावणे हे आपले परम कर्तव्य आहे असे अनेकांना वाटत असेजे काय थोडेफार वाचन वगैरे करणारे लोक होते त्यांची झेप वपु काळे  तत्सम यापलीकडे जात नसेहसरा समाधानी चेहराकामाला वाघपाहुण्यारावळ्यांना अर्ध्या  रात्रीही चारी ठाव स्वंयपाक करून वाढेल अशी अधिक शयनेषु रंभा अशी एक स्त्री प्रतिमा आदर्श म्हणून प्रोजेक्ट केली जात असेस्त्री वा पुरुष साहित्यिकांच्या लिखाणात प्रकर्षाने हेच दिसत असेसिनेमांच्याबद्दल तर सांगण्यातही अर्थ नाही
पण अश्या घट्ट कंटाळवाण्या माहौलमध्ये माझे घर जरा वेगळे होतेस्त्रीमिळून सार्‍याजणीगौरी देशपांडेआहे मनोहर तरी अश्या  खिडक्यांच्यातून आलेल्या वेगळ्या वार्‍यांचे माझ्या घरी स्वागत होतेआजूबाजूच्या वातावरणातून दिसणार्‍या आयुष्याबद्दलच्यास्त्री-पुरूष नात्याबद्दलच्या ज्या टिपिकल शक्यता समोर होत्या त्यांच्यापलीकडे अनेक शक्यता आहेत जगण्याच्या हे भान येण्यासाठी गौरी  देशपांड्यांच्या लिखाणाचा मला उपयोग झालाआजूबाजूचे वातावरण ज्या बावळट चौकटी घट्ट ठोकून बसवू पाहात होते ते नाकारले तरी बाई ही बाई असतेच आणि खरी  चांगलीही असू शकते हे तिने सांगितले मलायासाठी ती मला महत्वाची आहेआवडते हे म्हणायला लाज नाही वाटत मलामाझ्या अनेक मैत्रिणींना लग्नाचे रूखवतहरतालिकेची पूजा एकत्र करणे ही लाडकी अॅक्टिव्हिटी वाटत असेमला त्यावर आलेलाकंटाळा हे माझ्या वाया गेलेपणाचे प्रतिक होतेजीन्स घातल्यावर कपाळाला टिकली नाही म्हणून टिकलीचे पाकीट विकत घेऊन देऊन "आपण हिंदू आहोत.." वगैरे लेक्चर झोडणारे आचार्य लोक माझ्या मित्रमंडळात होतेमाझ्या शाळेतल्या अनेक शिक्षिकांना आजही आमच्या शाळेच्या मुली घराला पहिलं महत्व देतात याचं कौतुक आहे.
या सगळ्यात माझी टिनेजकॉलेजची वर्षे तिच्या लिखाणाचा मला आधार मिळालापरंपरासंस्कृती वगैरेचे फास मी स्वतःला बसू दिले नाहीत ते तिच्यामुळेती परीपूर्ण लेखिका वगैरे आहे किंवा नाही हा मुद्दाच नाहीआज तिचे वाचल्यावर ती मला तशीच आवडेलपचेलपटेल का हे माहिती नाहीती महत्वाची लेखिका होती हे नक्की
तिच्या साहित्यिक महत्वाला छाटून कमी करण्यासाठी कीबोर्ड सरसावून अनेकांनी बरीच विधाने नुकतीच केली होती फेबुवरअमिताभ बच्चन ला मिळालेली प्रसिद्धी आणि गौरीला मिळालेले फॉलोइंग एकाच प्रतीचेगौरीच्या व्यक्तिमत्वामुळे तिचा साहित्यिक बोलबाला झाला असले   काहीही तर्क वाचलेहे तर्क करणारे सगळे पुरुष आहेत ही एक वेगळी गंमतहाडामासाची नायिका विथ ऑल हर फॉलीज आणि पुरुषी इगोला फारशी भीक  घालणारी हे अजूनही किती जणांना दुखते आहे हे बघून मजा वाटली

नी

Monday, February 26, 2018

फ्लॉवरची 'सा. खि.' भाजी

लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
एक फ्लॉवर
एक छोटा बटाटा (ऑप्शनल आहे)
तूप (फोडणीसाठी) - २ छोटे चमचे किंवा फ्लॉवरच्या क्वांटिटिप्रमाणे
जिरे, हिरवी मिरची, मीठ, लिंबू
दाण्याचे कूट
किंचित साखर
कोथिंबीर
क्रमवार पाककृती: 
फ्लॉवर व्यवस्थित बघून मग बारीक चिरून, धुवून घेणे.
साखर, मीठ, लिंबू आणि दाण्याचे कूट याच वेळेला फ्लॉवरमधे मिक्स करायला हरकत नाही. 
बटाट्याच्या पातळ काचर्‍या करून घेणे.
कढईत तूप घेणे, वितळवणे
फोडणीत जिरे, तडतडल्यावर हिरवी मिरची घालणे
त्यात बटाट्याच्या काचर्‍या परतून किंचित वाफ.
काचर्‍या शिजल्या की बारीक चिरलेला फ्लॉवर (साखर, मीठ, दा कू आणि लिंबू मिश्रीत) कढईत घालणे. परतणे.
साखर, मीठ, दा कू आणि लिंबू हे आधी घातले नसल्यास आता घालणे.
मिक्स करणे, परतणे, फ्लॉवर शिजेपर्यंत एक वाफ काढणे... 
भाजी तय्यार!
वरून सढळ हाताने बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवणे
वाढणी/प्रमाण: 
साधारण २ माणसांसाठी दोन भाजी पोर्शन्स प्रत्येकी.
अधिक टिपा: 
ज्या मुलांना फ्लॉवरच्या नेहमीच्या भाजीचा वास आवडत नाही ती मुले ही भाजी मिटक्या मारत खातील.
डब्यात देण्यासाठी, पोळीभाजीचा रोल करून देण्यासाठी म्हणून एकदम उत्तम भाजी.
ही भाजी दह्याबरोबर अप्रतिम लागते.
पोळीबरोबरच खायची गरज नाही. नुसती प्लेटमधे साबुदाणा खिचडीसारखी घेऊन वरून घट्ट दह्याची कवडी आणि उपासाचे लिंबू लोणचे... अहाहा स्वर्ग!!
माहितीचा स्रोत: 
माझ्या आईची रेसिपी

Monday, November 20, 2017

साडीवरून ट्रेंचकोट!

हा लेख भारताच्या तिसर्‍या पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दिच्या निमित्ताने दैनिक लोकमतने १९ नोव्हेंबर २०१७ रोजी काढलेल्या पुरवणीत छापून आला होता. जागेअभावी थोडी काटछाट झाली होती. पूर्ण लेख इथे देत आहे. लोकमतची लिंकही लेखाखाली दिली आहे. 
-----------------------------------------
हॅण्डलूमची टापटिपीने नेसलेली साडी, डोळ्यात घुसणारे रंग, अगदी मोजके किंवा नसलेलेच दागिने आणि इतर गोष्टी, व्यवस्थित बसवलेले छोटे केस, साधेपणा, नीटनेटकेपणा पुरेपूर. हा जामानिमा केलेली व्यक्ती दिसली की आपोआपच ती व्यक्ती विद्वान, कर्तुत्ववान, उच्चपदस्थ, आदरणीय इत्यादी असणार असा आपला सर्वांचा समज होतो. आदरणीय विदुषी वेशभूषेचा गाभा अजूनही साधारण हाच आहे
आदर्श भारतीय स्त्रीचे जे चित्र एरवी उभे केले जाते ते तथाकथित सौभाग्यचिन्हे, गजरे, दागिने यांचा भरपूर वापर, लांबसडक केस अश्या गोष्टींशिवाय पूर्ण होत नाही. तरीही जिथे अधिकार आणि कणखरपणा आला तिथे या सगळ्या पारंपरिक गोष्टींना छेद दिला जातोच आहेहे कुठून आलं?
या प्रश्नाचं उत्तर शोधत परंपरेला छेद देणार्‍या एका स्त्रीपाशी जाऊन पोहोचले. भारतातल्या महत्वाच्या स्त्रियांच्या यादीमधे त्यांचं नाव आदराने घेतलं जातं त्या भारताच्या तिसर्‍या पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी
लहानपणी घरी दूरदर्शनवरच्या बातम्या रोज लावल्या जात. इंदिराजी तेव्हा पंतप्रधान होत्या त्यामुळे बातम्यांमधे रोजच त्यांचे दर्शन घडे. आणिबाणी नंतरच्या सर्व वादळांमधून तावून सुलाखून परत देशाचा गाडा हाकण्याच्या पदावर विराजमान झालेल्या होत्या. आणिबाणीच्या काळात दुपट्यात असलेल्या माझ्या पिढीला हा इतिहास तेव्हा माहिती असण्याची शक्यता नव्हतीपण त्या सर्व बातम्यांमधे त्यांच्याइतकं बघत राहावं असं कुणी दिसत नसेअगदी इतक्या वर्षांनंतर आजही ते लक्षात आहे
मी ज्या काळात आणि ज्या वातावरणात वाढले तिथे बहुतेक सर्व बायका साड्याच नेसत. साड्या नेसणार्‍या आई, आजी, शाळेतल्या बाई, समोरच्या काकू अश्या असंख्य स्त्रियांपेक्षा आणि टिव्हिवरच्या विविध मावश्यांच्यापेक्षा या बातम्यांमधे दिसणार्‍या पंतप्रधान आजी साडीमधेच असल्या तरी वेगळ्या दिसायच्या, वेगळ्या वाटायच्या. मी सहावीत असताना त्यांचा अत्यंत दुर्दैवी आणि भीषण असा अंत झाला. मग हळूहळू बातम्यांमधूनही त्यांच्या जुन्या क्लिप्स दाखवणं बंद होत गेलं. पण मनामधे अतिशय ग्रेसफुल, कणखर अशी त्यांची छबी कायम राह्यली
काय काय होतं या छबीमधे? साधी साडीसारखी तर साडी मग ती इतकी वेगळी कशी काय? इंदिराजींचे राजकारण, निर्णय, चूक की बरोबर हा या लेखाचा विषय नाही. त्यांना मिळालेली लोकप्रियता आणि जनतेचं प्रेम बघताक्या बात थी उनमे जो बाकीयोंमे नही?” हे त्यांच्या राहणीतून शोधायचा हा छोटासा प्रयत्न आहे
राजकीय कार्यकर्ती ते पंतप्रधानपद  या सगळ्यातच कामानिमित्ताने प्रवास भरपूर, हालचाल भरपूर त्यामुळे अंगावरचे कपडे या सगळ्यासाठी सोयीचे असायला हवेत. तसेच हे काम म्हणजे लोकांशी संपर्क भरपूर. लोकांना विश्वास वाटायचा असेल तर साडीला पर्याय नाहीच. त्यातून परंपरा जपल्यासारखं होतं ना!
स्वातंत्र्यपूर्व काळातला जन्म, जडणघडण आणि वाढणं, वडिलांचं स्वातंत्र्य लढ्याच्या अगदी केंद्रस्थानी असणं या सगळ्यामुळे इंदिराजींनी आपल्या कपड्यांमधे खादीचा मुबलक वापर करणं हे तर ओघाने आलंच. पंडीत नेहरू तुरूंगात असताना त्यांनी विणलेली खादीची गुलाबी साडी लेऊन इंदिराजी विवाहबद्ध झाल्या होत्या
ब्रिटिशांनी इथले पारंपरिक उद्योगधंदे आणि कारागीर देशोधडीला लावले. याला विरोध म्हणून स्वदेशी चळवळ, खादी या संकल्पना निर्माण झाल्या हा इतिहास आपल्याला माहितीच आहे. स्वातंत्र्योत्तर काळामधे पारंपरिक कला, हस्तकला यांना उत्तेजन मिळावे यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले गेले. इंदिराजींच्या कारकिर्दीत त्यांनी या पारंपरिक हस्तकला हातमागाच्या उद्योगांना चालना देण्यासाठी विशेष लक्ष घातले
याचाच एक भाग म्हणून खादीच्या बरोबरीने पारंपरिक हातमागावर, पारंपरिक विणकरांनी विणलेल्या साड्या हा त्यांच्या कपड्यांचा एक महत्वाचा भाग होताशक्यतो सुतीच पण कधी कधी विशेष निमित्ताने त्या रेशमी साड्याही वापरत. देशभरातल्या विविध प्रकारच्या हातमागाच्या साड्या त्या वापरत असत. इतकेच नव्हे तर एखाद्या ठिकाणी जाताना ज्या राज्याला, ज्या गावाला भेट द्यायची त्या राज्याची परंपरा असलेली साडी नेसणे, तिथली परंपरा असलेल्या वस्तूंचा वापर करणे हे त्या कटाक्षाने करतते ही असे की नेसलेल्या साडीवरूनअमुक राज्याचे पारंपरिक कापड तमुक आहे.’ असे सामान्य जनतेचे शिक्षण व्हावे. साड्यांची निवड करताना त्यांचे रंग वा त्यावर असलेली नक्षी या सर्वांमधे साधेपणा, डोळ्याला सुखद, अंगावर येणारे रंग वा नक्षी आणि श्रीमंतीचे प्रदर्शन करताही अभिरूची जपणे या निकषांवर निवड केली जात असेजिथल्या तिथल्या जनतेला हीआपलीपंतप्रधान आहे हे वाटू देण्यात या गोष्टीचा फार मोठा वाटा होता
हे झालं साड्यांच्या कापडाविषयीत्यांच्या साडीची नेसण हा त्यांच्या ग्रेसफुल आणि कणखर दिसण्यातला दुसरा महत्वाचा भाग. स्टार्च केलेली सुती साडी. निर्‍या व्यवस्थित इस्त्री केल्यासारख्या जुळवलेल्या. सभासंमेलनांमधे डोक्यावरून घेतलेला पदर तर कामकाजाच्या वेळेस हालचालींच्या आड येणार नाही असा एका खांद्यावर असलेला पदर. ही काही त्यांच्या नेसणीची वैशिष्ट्ये म्हणता येतील
कुठूनही शरीर दिसायला वाव नाही असे पूर्ण गळाबंद आणि कमरेपर्यंत येणारे ब्लाऊज ही त्यांच्या कपड्यांमधली एक महत्वाची गोष्ट आहे. अंगभर कपडे, व्यवस्थित सर्व बाजूंनी झाकलेले शरीर म्हणजे आदरच आदर हे बालिश व्हिक्टोरियन समीकरण आजही आपल्या मानसिकतेत घट्ट रुतून बसलेले आहे. त्यांच्या काळात तर या समीकरणाचा पगडा भरपूर असणार. त्यांच्या राजकारण प्रवेशाच्या काळात त्यांनागुंगी गुडियाम्हणून हेटाळले गेले होते, स्त्रियांचे म्हणणे गंभीरपणे घ्यायची परंपरा जगात कुठेच नव्हती तशी आपल्याकडेही नव्हतीच. याचा सामना त्यांनी केला होता त्यामुळे त्यांच्या कापड,चोपड, आभूषणे यातल्या प्रत्येक निवडीच्या मागे जनमानसातल्या आदरणीय गोष्टी कुठल्या याचे भान जाणवते.
त्यांचे दागिने आभूषणे यात एक रूद्राक्षाची माळ एक मनगटी घड्याळ या दोनच वस्तूंचा समावेश होता. बाकी सोन्यामोत्याचे हार, कर्णफुलं, बांगड्या वगैरे गोष्टींना पूर्णपणे फाटा दिलेला होता. यामधे स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी याबरोबरच उपयुक्तता, सोय याचाही भाग होता. सुरूवातीपासूनच त्यांनी दागिन्यांना बराचसा फाटाच दिलेला होता. मात्र १९६० साली त्यांच्या पतिच्या निधनानंतर त्यांचे काहीच दागिने घालणे हे मात्र जनतेच्या दृष्टीने आदरणीय ठरून गेले असावे
साडीवरून ट्रेंच कोट असे भारतीय पाश्चात्य फॅशनचे एकत्रीकरण त्यांनी बरेचदा केले. अतिशय ग्रेसफुली केले. परंपरा आधुनिकता यांचा संगम असा एक घासून गुळगुळीत झालेला पण तरीही चपखल वाक्प्रचार इथे वापरता येईल
व्यवस्थित बसवलेले छोटे केस आणि त्यात एक पांढर्‍या केसांची बट ही खास त्यांची ओळख म्हणता यावी अशी गोष्ट. १९६० च्या दशकाच्या शेवटी त्यांनी आपले केस कापून लहान केले आणि एक पांढरी बट सोडून देऊन बाकी सर्व काळे ठेवले. नंतर वेळोवेळी ते तसेच ठेवण्यासाठी हेअरड्रेसरकडून टचप करून घेतले जात असत.  
हवी तशी साडी शोधणे, त्यावर हव्या त्या रंगाचा ब्लाऊजपीस मिळवणे, टेलरच्या मागे लागून वेळच्या वेळेला ब्लाऊज शिवून घेणे आणि कपड्यांची बाकी सगळी उस्तवार करायला पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीला वेळ असण्याची शक्यता नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मदतनीस हा त्यांच्या राहणीचा अविभाज्य भाग होता. साधेपणा राखायचा तरी त्याला वेगळे कष्ट असतात हे खरे असले तरीही पूर्ण गेटप ही त्यांची डोळसपणे केलेली निवड होती हे नक्कीच 
पारंपरिक हस्तकलांचे महत्व ओळखून त्यांच्यामागे उभे राहतानाच इंदिराजींनी अनेक कुचकामी परंपरांना छेद दिला. बायकांनी मान खाली घालून गरीब गायीसारखे असावे, विधवा स्त्रीने एकभुक्त रहावे, जाडेभरडे ल्यावे, जगासमोर तोंड दाखवू नये वगैरे मूर्ख समजुतींना तर त्यांनी कचर्‍यासारखे उडवून लावले
परंपरां, पारंपरिक गोष्टी यातले काय निवडायचे, काय टाकायचे याबाबत प्रत्येक भारतीय स्त्रियांसाठी त्यांनी एक अप्रत्यक्षरित्या वस्तुपाठच घालून दिला आहे. एकिकडेपरंपरांचा अभिमानम्हणून सर्वच जुन्या गोष्टी प्राणपणाने जपत राहायच्या तर दुसरीकडेएतद्देशीय ते ते सर्व कुचकामीअसा टोकाचा दुराग्रह अश्या वातावरणात हा नीरक्षीरविवेक मला खूप महत्वाचा वाटतो

- नीरजा पटवर्धन
----------------------------
लोकमतची लिंक

Search This Blog